गडचिरोली जिल्ह्यात ओबीसीना 27 टक्के आरक्षण द्या -भाजपा नगरसेवक आशिष पिपरे यांची निवेदनाद्वारे मागणी

प्रेस नोट
दिनांक 17 ऑक्टोबर 2022
ओ.बी.सी कल्याण व सहकार मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब यांच्याकडे केली मागणी 
गडचिरोली जिल्हा नावालाच आदीवासी जिल्हा आहे मात्र या जिल्ह्यात गैर आदीवासींची लोकसंख्या 62 टक्के आहे, त्यात 90 टक्के लोक ओ.बी.सी आहेत या अगोदर जिल्हात ओ.बी.सी. ना आरक्षण होते पण महाविकास आघाडी काळात जिल्ह्यातील आदीवासी समाजाची लोकसंख्या ही 38 टक्के असतांनाच काही आदीवासी लोकप्रतिनिधीनी चुकीचा अहवाल तयार करून आदीवासींची लोकसंख्या मुद्दामच 50 टक्के च्या वर दाखवून जिल्ह्यातील ओ. बी. सी. आरक्षण संपवीले, हा ओ.बी.सी. समाजावर झालेला खूप मोठा अन्याय आहे यामुळे ओ.बी.सी. समाजात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
यामुळे तात्काळ नवीन अहवाल तयार करुन ओ. बी. सी. आरक्षण पुर्ववत करावे अशी मागणी जिल्ह्यातील समस्त ओ. बी. सी. समाजाच्या वतीने भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री नगरसेवक आशिष पिपरे यांनी मंत्री महोदय ओ.बी.सी कल्याण व सहकार मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब यांची मुंबई येथे  भाजपा ओबीसी आघाडी महाराष्ट्र राज्य चे वतीने आयोजित ओबीसी आघाडी बैठकीत भेट घेऊन सदर मागणी निवेदनाद्वारे केली आहे.    
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातपुते , सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी उपस्थित होते