आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली व आदिजन चेतनेचा जागर तर्फे धरणे आंदोलन

 न्युज जागर गडचिरोली

गडचिरोली,दि.१२/०३/२०२३

गोंडवाना विद्यापिठाचे “शहिद विर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली”, असे नामकरण करण्यात यावे 
– आदिवासी समाजाची एकमुखी मागणी

चंद्रपूर व गडचिरोली हे दोन्ही जिल्हे आदिवासी बहुल जिले असून शैक्षणिकदृष्टया अत्यंत मागास असा प्रदेश आहे. या भागातील आदिवासी विद्याथ्र्यांचा उच्च शिक्षणातील अत्यंत पसरलेला टक्का लक्षात घेऊन २ ऑक्टोबर २०११ रोजी नागपूर विद्यापिठाचे विभाजन करुन गोंडवाना विद्यापिठाची निर्मिती करण्यात आली. या भागातील आदिवासी विद्याथ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याच्या उद्देशाने या विद्यापिठाची निर्मिती करण्यात आली. पण विद्यापिठ निर्मितीचा मुख्य उद्देश बाजुलाच राहून विविध अनावश्यक कारणाने हे विद्यापीठ सदैव वादाच्या भोव-यात अडकून पडले. विद्याथ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार न करता विद्याथ्यांची गळती व स्थगिती अधिक कशी होईल याचीच तजवीज विद्यापिठ व्यवस्थापन करतांना दिसते, विद्यापिठाची स्थापना होऊन १५ वर्षे उलटूनही विद्यापिठाचे पदव्युत्तर महाविद्यालय (PGTD) अस्तित्वात आले नाही. अनेकवेळा अभ्यासक्रमाची व परिक्षेची पध्दत बदलण्यात येते. भरमसाठ परिक्षा फी आकारून विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवण्याची तजवीज पध्दतशीरपणे केली जात आहे. विद्यापिठाचे वसतीगृह निर्माण झाले नाही. अशा अनेक समस्यांच्या विळख्यात हे विद्यापीठ सापडले आहे.newsjagar

चंद्रपूर गडचिरोली जिल्हयाची सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता हा भाग गोंडवन म्हणून ओळखला जातो. ही ओळख कायम रहावी म्हणून विद्यापिठाला गोंडवाना विद्यापिठ असे नाव देण्यात आले. परंतु विद्यापिठाच्या या पंधरा वर्षाच्या कालखंडात सात कुलगुरू झालेत. यात एकही आदिवासी व्यक्ति कुलगुरु होऊ शकला नाही हे आदिवासींचे दुर्देव आदिवासीमध्ये विचारवंत, उत्तम प्रशासक, अभ्यासु व्यक्ति नाहित काय ? कि आदिवासींना डावलण्याचे षडयंत्र आहे ? आदिवासीच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकिय व एकुणच समाज जीवनाचा अभ्यास करण्यासाठी विद्यापिठाच्या व्यवस्थापनाला आदिवासी अध्यासन निर्माण करण्याची गरज वाटली नाही काय ? कि हे ही एक कारस्थान समजावे? ज्यांचा या गोंडवानाशी व यात वास्तव्यास असणा-या लोकांच्या समाज जीवनाशी कवडीचाही संबंध नसणा-या प्रस्थापित नावांचा विचार विद्यापिठाच्या नामविस्तारासाठी केला जातो हे ही एक षडयंत्रच आहे. गोंडवनात पाचशे ते सहाशे वर्ष गोंड राजांचे एकछत्री साम्राज्य राहिले आहे. याच भूमित १८५७ च्या राष्ट्रीय उठावात आपल्या प्राणाची आहुती अवघ्या पंचेविसाव्या वर्षी देणा-या स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचा प्रामुख्याने विचार करावाच लागेल. गोंडवाना विद्यापिठाचे “स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली” असे नामकरण करण्यात यावे. गोंडवाना विद्यापीठातील सभागृहास गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार आदरनिय बाबुराजी मडावी नाव देण्यात यावे या दोन मागण्यांन सह अन्य ११ मागण्यांसाठी दि. ११ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली व आदिजन चेतनेचा जागर चंद्रपुर चे कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव यांनी मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनातील मागण्यांन कडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास भविष्यात लाक्षणिक स्वरुपाचे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यासाठी आदिवासी आपल्या अस्मिता व अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा आंदोलनातील मान्यवर आदिजन चेतनेचा जागरचे अध्यक्ष मा. अशोक तुमराम व आदिवासी एकता युवा समिती, गडचिरोलीचे अध्यक्ष मा. उमेशभाऊ उईके, आदिवासी विचारवंत प्रियदर्शन मडावी, आदिवासी एम्प्लाईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गावळ, वनिश्याम येरमे, सदानंद ताराम यांनी दिला. यावेळी सर्व आदिवासी बांधवांनी समाजातील सर्व थोर पुरुषांचा जयघोष करुन गोंडवाना विद्यापीठाचे शहिद विर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके असे नामकरण झालेच पाहिजे असा नारा सुध्दा यावेळी देण्यात आला. सदर धरणे आंदोलनात श्री. प्रदिप कुलसंगे, माणिक गेडाम, प्रफुल कोडापे, संजय मसराम, वासुदेव कोडाप, मंगेश नैताम, मुकुंदाजी मेश्राम, संजय उईके, सुधीर मसराम, आकाश कोडापे, गिरीश उईके, प्रशांत मडावी, रमेश चीकराम, टिकाराम मडावी, वामन गणवीर, मधुकर कोडापे, पुप्षा मडावी, सारिका ऊईके, हेमा कुलसंगे, मालता पुडो, निता रायसिडाम, सुमित्रा आत्राम, जयश्री मडावी, अरुण शेडमाके, कालिदास गेडाम, रुषी आत्राम, पुंडलिक आत्राम, भजन मायन, प्रविण तलांडे, देवराव कोवे, विष्णुदास कुमरे, गोकुल मेश्राम, बंडु रायसिडाम, सुरेश मेश्राम, हरीदास अलाम, ढिवरुजी मेश्राम इ. आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.