चामोर्शी शहरात होणार भव्य ईको पार्क -नगरसेवक आशिष पिपरे यांच्या मागणीला आले यश.

चामोर्शी तालुका प्रतिनिधी

चामोर्शी शहरात वन विभागाच्या वतीने वन विभागाचे पडीत असलेले व गेल्या अनेक वर्षांपासून सौंदर्य करण करिता प्रलंबित असलेल्या वन विभागाचे दुर्लक्षित असलेल्या  बगीचास मुल व बल्लारपूर प्रमाणे इको पार्क मधे परिवर्तन करण्याची मागणी येथील नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी आज मंत्रालय मुंबई येथे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वन विभागाच्या बैठकीत पत्राद्वारे केली. नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार वनमंत्री यांनी चामोर्शी शहरात मुल व बल्लारपूर प्रमाणे भव्य इको पार्क नक्कीच तयार करणार असे आश्वासन दिले. या वेळी नगरसेवक आशीष भाऊ यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात शहराची लोकसंख्या मोठ्या संख्येने वाढली परंतु शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही.व शहरात नागरिकांना निवांत क्षणी वेळ घालवण्यासाठी व शहराबाहेर फिरण्यासाठी व नागरिकांच्या मनोरंजनासाठी कोणतेही सुयोग्य बागीच्याचे ठिकाण नाही. व कोणत्याही लोकप्रतिनिधी यांनी सदर मागणी करून इको पार्क निर्माण करण्या बाबत पाठपुरावा केला नाही. या बद्दल खंत व्यक्त केली व आज सदर मागणी आज नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी मंत्रालय मुंबई येथे वन मंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत निवेदन सादर करून लावून धरले व सदर मागणीस वन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी तत्वतः मंजूरी दिल्याबद्दल त्यांचे चामोर्शी शहरवासीयांच्या वतीने जाहीर आभार मानले जात आहे. व नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.