श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील स्वाब संस्थेच्या वतीने या आठवड्यात सिंदेवाही वन परीक्षेत्रातील राजुरी जवळील विरवा येथे 35 कि.मी. अंतर जाऊन येथील कोंबडी फार्म मध्ये घुसुन कोंबडी , व अंडे खाऊन असलेल्या एका अजगराला पकडून, सिंदेवाही वनपरिक्षेत्रात सुरक्षित ठिकाणी सोडून. तर आलेवाही येथील कासी तलावात व केवाळा तलावात मच्छीमारांच्या जाळ्यात लटकलेल्या दोन अजगरांना सुरक्षित सोडवून 3 तीन अजगरासह,1 एक उदमांजर व 6 सहा नागांना जीवदान दिले.
त्यापैकी आलेवाही येथील केवाळा तलावातील मच्छीमारांच्या जाळ्यात लटकून जख्मी झालेल्या अजगराला सिंदेवाही येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन पशुसंवर्धन अधिकारी कु.शालिनी लोंढे यांच्याद्वारे मलमपट्टी करून सुरक्षित स्थळी सोडून जीवदान दिले. तर उश्राळा मेंढा येथील सरपंच हेमंत लांजेवार यांच्या गोठ्यात असलेल्या 2 दोन नाग सापांना व परिसरातील इतर 4 चार असे 6 सहा नाग सापांना पकडून तळोधी बा. वनपरिक्षेत्र कार्यालयात नोंदणी करुन जंगलात सुरक्षित सोडून जीवदान दिले.
त्यासोबत सावरगाव येथील श्रीराम बोरकर यांच्या घरात घुसलेल्या उदमांजर (Civet cat) ला पकडून गावाबाहेर जंगलात सोडून जीवदान दिले. अशा प्रकारे या पावसाळ्यात एकूण दहा अजगरांना व साठ च्या वर नाग सापांना व एका ऊदमांजरी ला सुरक्षित ठिकाणी सोडून स्वाब संस्थेच्या सर्पमित्र सदस्यांच्या द्वारे जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अजगराला सोडताना डोंगरगाव चे वनरक्षक चहांदे, कच्चे पार चे वनरक्षक चौधरी हे उपस्थित होते. तर केवाळा तलावात जाळ्यात अडकलेल्या जखमी अजगराला सिंदेवाही येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय उपचार करून सुरक्षित ठिकाणी सोडताना तळोधी बा. चे वनरक्षक पेंदाम, तर काही तलावातील जळात अडकडलेल्या अजगर सापाला सोडताना क्षेत्र सहाय्यक गरमाडे, वनरक्षक पेंदाम, वनमजूर उईके हे उपस्थित होते.
विशेष म्हणजे सततच्या पावसामुळे व नद्यांना आलेल्या पुरांमुळे अजगरांची संख्या परिसरात जास्त आढळून येत आहे. या पावसाळ्यातील याच परिक्षेत्रातील तलावातील मच्छीमाराच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जाळ्यात अडकलेल्या एकुण 10 दहाअजगरांना व इतर विषारी बिनविषारी अशा विविध 64 चौसष्ट सापांना ‘स्वाब’ संस्थेचे सदस्य/ सर्पमित्र जीवेश सयाम, महेश बोरकर, यश कायरकर, हितेश मुंगमोडे, आदिनी वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेल्या सापांची वनविभागात नोंद करून त्यांना सुरक्षित सोडून जीवदान दिले. त्यांच्या या कार्याबद्दल वनविभाग व परिसरातील लोकांद्वारे कौतुक केलं जातं आहे.