श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
रत्नापूर दि 4 जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका आहे सदर तालुक्यात नाना विध प्रजातीचे धानाचे उदा एच एम टी सुवर्णा श्रीराम चेन्नुर मोहरा अशा अनेक धानाचे उत्पन्न शेतकरी आपले शेतात घेतात या वर्षाला धान पिकाला लागणारा पाणी पाऊस योग्य प्रमाणात झाला परतु नैसर्गीक रोगराई ची आपत्ती शेतकरी यांनी लावलेल्या धान पिकावर आली उदा मावा तुरतुडा करपा लाल्या पीसोर बोड अळी यामुळे धान पीक उत्पन्नात मोठया प्रमाणात घट होत आहे एकरी पंधरा ते सतरा क्वींटल होणारे धान पाच ते सहा क्वींटल वर येवून ठेपले आहेत आणी सर्व मजुरी खत नांगरनी वखरनी याचे भाव वाढलेले आहेत म्हणून त्यांना होणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च एकरी जास्त होत आहे त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असुन चिंताग्रस्त बनल्याचे चित्र दिसून येत आहे.
शासनाचा हमीभाव 20 40 रुपये आहे यात उत्पन्नानुसार . शेतात लागलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने शेती व्यवसाय पूर्णतः तोट्यात जात आहे सतत चारपाच वर्षापासून शेतकरी जनतेला हा नुकसानी चा फटका सहन करावा लागतो आहे तरी पण दरवर्षाला शेतकरी हा आपला परंपरागत व्यवसाय सुरू ठेवत आहेत एक नवि आशा घेवून या वर्षाला तरी आपल्याला काहीतरी शेतातुन फायदा मिळेल या उदात्त हेतूने पण नशीबी मात्रा / निराशाच पदरी पडत आहे दरवर्षाला शेती पीक घेण्यासाठी लागणार आर्थिक कर्जाचा बोझा वाढतच आहे फायदा होईल आणी उसणवार बँकेचे कर्ज वापस करता येईल ही अपेक्षा शेतकरी जनतेची पूर्ण होत नाही कारण हया एवढया कमी प्रमाणात होणा-या उत्पन्नात परीवाराचा गाढा कसा हाकायचा हाच मोठा गभीर प्रश्न समोर ठाकला आहे एकतर शासनाकडून धानपीकाला कमी प्रमाणात हमीभाव मिळत आहे आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी राजा आज संकटात सापडला आहे तरी शासनाने हया सर्व बाबीचा व शेतकरी जनतेचा विचार करुण प्रती क्वीटल एकहजार रु बोनस जाहीर करुण शेतकरी जनतेला लाभ द्यावा व सोबतच प्रत्येक शेतकरी जनतेला पीक विमा याचा लाभ देण्यात यावा यामुळे शेतकरी जनतेला थोडासा दिलासा मिळण्यात मदत होईल अशी मागणी सेवा सहकारी संस्था रत्नापूर संचालक मंगेश बोरकर यांचेसह परीसरातील सर्व शेतकरी जनतेनी केली आहे



