श्री.विलास ढोरे, प्रतिनिधी,न्युज जागर
कुरखेडा ,दि.०८/०४/२०२३
सत्यपाल महाराज यांच्या जाहीर कीर्तनात विविध मान्यवरांनी केला मार्गदर्शन
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी किर्तन रुपी सागराच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून नवचैतन्य निर्माण केले परंतु आज जग बदलत आहे संस्कृती बदलत आहे या संस्कृतीचे जतन करण्यासाठी कीर्तन रुपी सागराची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांनी केले. ते घाटी येते सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या जाहीर कीर्तनात उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.newsjagar
यावेळी उद्घाटक म्हणून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, तर अध्यक्ष म्हणुन भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेडीवार, सहउद्घाटक आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार हरीराम वरखडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, माजी जिल्हा उपाध्यक्ष जिवन नाट, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक अडो. उमेश वालदे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, भाजयुमो तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, शिवसेना तालुकाप्रमुख आशिष काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, महादेव पाटिल नाकाडे, सरापंच मोहिनी गायकवाड, उद्धव गाहने व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी समाज प्रबोधन किर्तनात मार्गदर्शन करताना म्हटले की कीर्तनातून माणसाचे आचार विचार हे शुद्ध होत असतात व कीर्तनातून जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते असे विचार व्यक्त केले.
यावेळी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार हरीराम वरखडे, आनंदराव गेडाम, सुरेंद्र सिंह चंदेल,प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर,यांनी किर्तनरुपी सागरात भाविक भक्तांना मार्गदर्शन केले.
सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधन पर कीर्तन ऐकण्याकरिता परिसरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपचंद दखने यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार त्र्यंबक नाकाडे यांनी केले.