पोंभूर्णा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीचा कहर ! प्रशासन सुस्त ??

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२८ नोव्हेंबर २०२२

पोंभुर्णा 

तालुक्यात सध्या अवैध रेती वाहतुकीने कहर केला असून प्रशासनाकडुन आर्थिक गणित डोळ्यासमोर ठेवत सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. पोंभूर्णा तालुक्यातील अंधारी नदी काठावर रेतीचे मोठे-मोठे उंच असे ढिगारे उभारले आहेत व त्या ढिगाऱ्यावरून भरदिवसा पोकलॉन्ड व जेसीबीच्या साह्याने दहा- बारा चाकी ट्रक-टिपर मध्ये भरुन राजरोस पणे जिल्हाच्या मार्गे वाहतूक होत आहे. त्याच ढिगाऱ्यावर मध्यरात्री नदीतून उत्खनन करुन रेती टाकल्याजात असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. ट्रॅक्टर वाले सुद्धा रात्री चोर मार्गाने अवैद्य रेती तालुक्यातील गावा-गावांत व ठेकेदारांच्या साईटवर टाकत आहेत.महसूल प्रशासनाचा खालच्या पातळीवर असलेला कोतवाल,पोलिस पाटिल व तलाठी पदावरील कर्मचारी गावात असताना अवैध रेती वाहतुकीसाठी ढिगारे कुणाच्या परवानगीने मारले जातात ? असा सवाल जनतेतुन विचारला जात आहे.

तालुक्यात अंधेरी व वैनगंगा नद्या आहेत. या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध असल्याने मागिल वर्षी चेक वेळवा,आष्टा,घाटकूळ,चेक बल्लारपुर-१ व चेक बल्लारपर-२ असे पाच घाट लिलाव झाले होते.या घाटावर उत्खनन १०जून पर्यंत तर वाहतुकीची मुदत १६ ऑक्टोंबर पर्यंत होती. मात्र ह्या घाटाच्या काठावर व भीमणी रस्त्यालगत मोठ -मोठे रेती ढिगारे असुन त्या ढिगाऱ्यांसाठी वाहतुकीची परवानगी नसल्याने ढिगारे उभे आहेत मात्र रेती माफियानी नवी शक्कल लढवत रेती उत्खनन सोबत वहातूक होत असुन सबंधीत प्रशसानाचे याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

परीसरातील रेती माफियांना नेमके अभय कुणाचे..?

अवैध रेतीचोरी कारवाई थंडबस्त्यात आहे,प्रशासनाला लाखो रुपयाचा चुना लावला जात असुन ,वाळु माफियांना कारवाईची भिती नाही…कुठल्याही महसुल अधिकाऱ्यांचे व पोलीस अधिकाऱ्यांचे वचक नसल्यामुळे दिवसाढवळ्या खुलेपणाने रेती वाहतूक होत आहे. या परीसरात दिवसा अवैध रेती तस्करी रेती वाहतुक करतांना अनेक विनानंबर प्लेटच्या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे.यात ट्रॅक्टर,टिप्पर यासह अन्य वाहनांचा समावेश होत आहे.त्यामुळे वाळु तस्करांचे चांगभले होत आहे.वाळु तस्कर राञीचा दिवस करून नदि पात्रात ट्राक्टरने व टिप्परमध्ये जेसीबीच्या सहाय्याने रेतीऊपसा करीत आहेत. मुख्य मार्गावरुन रेतीची अवैध वाहतुक केली जात आहे.यावर ठोस कारवाई होतांना दिसत नाही. कित्येकदा प्रकरण दाबल्याचेही प्रकार अधुन मधुन घडत असल्याची माहिती खाञीलायक सूत्रांनी दिली आहे.

रेतीची वाहनेही वेळीच लोकेशन सांगुन वळविली जातात त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून अवैध गौणखनिज प्रकरणी ठोस कारवाई होने गरजेचे आहे.या कडे जिल्हा खनिकर्म अधीकारी व जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.🔅