दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर 

विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी

 

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.

नुकतेच ०६ लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर (२६) रा. तिम्मा जवेली ता. एटापल्ली जि.. गडचिरोली व रोशनी ऊर्फ ईरये नरंगो पल्लो (३०) रा. डॉडीमरका पोमके आरेच्छा जि. नारायणपुर (छ.ग.) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

नामे अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर हा माहे डिसेंबर २००९ ला कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे मे २०१० पर्यंत कार्यरत होता,माहे मे २०१० ते २०१२ पर्यंत कसनसूर दलममध्ये कार्यरत होता तसेच सन २०१२ ते २०२२ या दरम्यान घरी राहूनच नक्षल दलमने सांगितलेले कामे करत होता.

सन २०११ मध्ये मौजा खोब्रामेंढा ॲम्बुशमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफ १९१ बटालियनचे १ जवान शहीद व ०५ जवान जखमी झाले होते, सन २०११ मध्ये मौजा निहायकल ते ग्यारापत्ती रोडवरील ॲम्बुशमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफ १९१ बटालियनचे ०५ जवान जखमी झाले होते, सन २०११ मध्ये मोजा छोटा झेलीया जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता.

वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही.
पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे.
वरिष्ठ कॅडरचे माओवादी सर्व जमा केलेला पैसा स्वतःच्या उन्नतीसाठी वापरतात व कनिष्ठ माओवाद्यांना गरजेपुरताही पैसा दिला जात नाही.
खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वतःच्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्या जात नाही.
अश्या विविध कारणामुळे त्यांनी आत्मसमर्पण केल्याचे सांगितले

महाराष्ट्र शासनाने अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर याचेवर ०४ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले. होते.

 

 

तर दुसरी जहाल नक्षलवादी रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो असून ती
सन २००९ ला जटपूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन ०१ महीना कार्यरत होती, सन २००९ ते २०१५ पर्यंत झोन टेक्नीकल दलममध्ये कार्यरत होती, सन २०१५ ते सन २०१८ पर्यंत एसीएम व उपकमांडर पदावर कार्यरत राहून माहे जुलै २०१८ ते सन २०२२ पर्यंत घरी राहून दलमचे काम करत होती
सन २०१५ मध्ये मौजा कुंदला (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी होती, सन २०१५ मध्ये मोजा गुंडुरपारा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी होती, सन २०१७ मध्ये मौजा दुरवडा (छ.ग.) येथे गोटूलमध्ये झालेल्या व जंगल परिसरात झालेल्या एकुण दोन चकमकीमध्ये सहभागी होती, सन २०१५ मध्ये भामरागड तालुक्यातील मौजा इरपनार गावातील ०३ इसमाचा तीने खुन केलेला आहे.
नक्षलींना कोणत्याही कामासाठी पैसे दिले जात नाही, नक्षल दलममध्ये वरिष्ठ माओवाद्यांकडून स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये भेदभाव केला जातो, महीला नक्षलवाद्यांना वरच्या पदापर्यंत जाण्याची संधी मिळत नाही, वरिष्ठ माओवाद्याकडून महीला नक्षलींना लग्नासाठी बळजबरी केली जाते, पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान महीला नक्षलींना समोर करून पुरूष नक्षलवादी हे पळून जातात इत्यादी कारणामुळे तिले समर्पण केले असल्याचे कळले आहे
रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो हिचेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर व रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो , या दोघांनाही प्रत्येकी ५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०१९ ते २०२२ सालामध्ये आतापर्यंत एकूण ५१ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल यांनी केले आहे.