वीज पडून दोन महिलांचा जागीच मृत्यू

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

जिवती तालुक्यातील पाटण/ चिखली परिसरात बुधवारी सायंकाळी उशीरा विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसात वीज पडून 2 महिलांची मृत्यू झाला.

चिखली येथे राहणारे सौ.वंदना चंदू कोटनाके (३५), सौ. भारुला अनिल कोरांगे (३२) यांचा जागीच मृत्यू झाला. आणि जखमी 3 जण आहेत. सौ.वंदना कोटनाके यांना १ मुलगा, १ मुलगी, आणि भारुला कोरांगे यांना ०१ मुलगा आहेत.
कु. सुरेखा जागेराव वेडमे ही जखमी आहे.
सायंकाळी शेतीचा काम करून सायंकाळी घरी परत येत होते एकूण ५ महिला व मुली होते. त्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाला. २ महिलांचा यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
०३ जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहे.