शाळा बंद निर्णयाविरोधात छात्रभारीतचे आंदोलन

विशेष प्रतिनिधी  न्युज जागर 

नुकताच राज्य सरकारने राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासन निर्णय घेत आहे. शासनाच्या या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या विरोधात छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासनाच्या या निर्णया विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची सुरवात छात्रभारतीने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथुन सुरूवात केली. यावेळी छात्रभारती संगमनेर शाखेच्या वतीने संगमनेर बस स्थानक, व प्रांत कार्यालयसमोर ठिय्या आंदोलन करून मराठी शाळा या गोर गरीब जनतेच्या आहे, कोणाच्या बापाच्या नाही असे छात्रभारती ने या आंदोलनात ठणकावून सांगितले. राज्यातील सतरा हजार पेक्षा जास्त शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे, यानिर्णया मुळे राज्याच्या दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच भविष्य अंधारमय होईल. शासनाच्या या निर्णयाचा आणि गरिबांचे शिक्षण बंद करणाऱ्या मानसिकतेचा छात्रभारती तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे, शाळा घरापासून लांब गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन, मुली तर शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या जाण्याची परिस्थिती निर्माण होण्याची भिती छात्रभारतीने व्यक्त केली.

शासनाचा हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणारा आहे, ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवायचे असेल तर हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशा विनंतीचे पत्रक प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या मार्फत शिक्षणमंत्री यांना देण्यात आले.

यावेळी छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, माजी राज्य अध्यक्ष दत्ता ढगे, गणेश जोंधळे, राहुल जन्हाड, विशाल शिंदे, तृप्ती जोर्वेकर, ओंकार अभंग, प्रतीक्षा भोसले, हर्षल कोकणे, अवनतीका जोर्वेकर, राधेश्याम थिटमें, सोनाली हांडे, शुभम कोल्हे, प्रसाद लोंढे, अजय ठोबरे, भोसले ज्योती, कानवडे आकाश, कोल्हे वैष्णव, ” कानवडे अनिरुद्ध, साहिल जोर्वेकर, हृतिक वर्पे, खताळ शिवप्रसाद, राहणे विक्रम, वावरे महेश, घुले वैष्णवी, दिघे प्रगती, भोसले ज्योती, आहेर कावेरी, कर्पे ज्ञानेश्वरी, गायकवाड आवजीनाथ, हांडे सिद्धार्थ, खरात सुमित, खताळ शिवप्रसाद, राहणे विक्रम, मोईन शेख, राम अरगडे आदी छात्रभारती कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.