याबाबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना काही नागरिकांनी माहिती दिली असता अजय कंकडालवार यांनी लगेच घटनास्थळ गाठून संबंधित प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना दूरध्वनीद्वारे कळविले व कारवाईची मागणी केली. अहेरीचे ठाणेदार किशोर मानभाव हे घटनास्थळ गाठून 40 वाहनावर सार्वजनिक रस्त्यावरील धोका निर्माण अटकाव करीत असल्याबाबत कलम 283 अंतर्गत कारवाई केली आहे. सध्या त्या संपूर्ण वाहन चालकांची कागदपत्रे तपासणी व पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती अहेरीचे ठाणेदार किशोर मानभाव यांनी दिली. तसेच याबाबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले की सुरजागड इथून वाहतुकीसाठी येणाऱ्या वाहन चालकांकडे परवाना नसून वाहनाचीही कागदपत्रे अपुरे असतात आणि गुंड प्रवृत्तीचे लोक सदर प्रकल्पात गुंतले असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.
सुरजागड प्रकल्प च्या 40 वाहनावर पोलीस विभागाची कलम 283 अंतर्गत कारवाई
श्री अनिल गुरनुले, अहेरी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
आष्टी – आल्लापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खमणचेरू – सुभाषग्राम जवळ सूरजागड येथून खनिज वाहतूक करण्याकरिता आलेल्या जवळपास 40 वाहनावर अहेरी पोलिसांकडून कलम 283 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
काल सायंकाळच्या सुमारास बहुचर्चित सुरजागड इथून खनिजांची वाहतूक करण्याकरिता आलेले 40 वाहने आष्टी, आलापली या राष्ट्रीय महामार्गावरील खमनचेरू, सुभाषग्राम जवळील रस्त्याच्या कडेला उभे करून होते. त्यामुळे आल्लापली,आष्टी मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना अडचण निर्माण झाली होती. आधीच खड्डेमय, अरुंद रस्ते त्यातला त्यात वाहने रस्त्यावर उभे करून ठेवल्याने त्या मार्गाने जाणारी नागरिकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहने पुढे जातील कसे असा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता.
वाहन चालक रस्त्यावर येणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांच्या वाहनांना साईट देत नाही. नागरिकांच्या अंगावर वाहने नेत असतात. यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांचा जीव गेला असून अशा गंभीर समस्येकडे शासन – प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. संपूर्ण रस्त्यांची निर्मिती होत पर्यंत उत्खनन व वाहतूक बंद करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.