श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
बल्लारपूर, दि. २३/१२/२०२२
युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्हारशाह महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती प्रिया झांबरे या बल्लारपूर कामगारांना योग्य न्याय मिळावा याकरिता उपोषणाला बसल्या असून प्रशासनाने याची दखल जरी घेतली नसली तरी बल्लारपूर च्या रहिवासीयांनी आणि कामगारांनी त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
न्यूज जागर चे मुख्य संपादक श्री.प्रदीप वाळके यांचेशी फोनवर बोलताना त्या म्हणाल्या कि पेपर मिल मुळे प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, हवेमध्ये दूषित गॅस पेपर मिल च्या माध्यमातून पसरविला जात याचे प्रमाण हळूहळू वाढत असून प्रदूषण विभागाला अनेक वेळा तक्रारी देऊनही काही फरक पडला नाही.
पेपर मिल ही गेल्या अनेक वर्षांपासून एका प्रस्थापित युनियनची गुलाम असून अनेक संघटनांनी आंदोलन केले परंतु ते आंदोलन दडपण्यात आले ,आंदोलक नेते हे सेटल झाले असा देखील आरोप बरेच वेळा कामगारांनी लावला त्यामुळे आता कामगारांना नेत्यांवरचा विश्वासच राहिलेला नाही परंतु कामगारांची समस्या कामगारांचे होत असलेले शोषण हे आजही बल्हारशाह पेपर मील मध्ये कायम आहे.
पुढे त्या म्हणाल्या कि जिल्ह्यातील एका बलाढ्य मानल्या जाणाऱ्या नेत्याची किमान दोन दशकांपासून त्या ठिकाणी युनियन आहे. कुठल्याही बेरोजगाराला स्थायी अथवा अस्थायी करण्याची ताकद ही कंपनी प्रशासनामध्ये नसून युनियन मध्ये आहे. जे निश्चितच बेकायदेशीरपणे सुरू आहे. कामगार कायद्याला तिलांजली देत सर्रासपणे मनमानी कारभार या बलाढ्य नेत्याची युनियन करते आहे. व यांना थांबविण्याकरिता झालेल्या सर्व प्रयत्नांना साम, दाम, दंड भेद वापरून या बलाढ्य नेत्याने आज पर्यंत विजय मिळवला आहे. परंतु कामगारांच्या मनात मात्र हा नेता आजही घर बनवू शकलेला नाही. आजही या मोठ्या नेत्याला कामगाराच्या मनामध्ये स्थान नाही. फक्त भीती पोटी म्हणून कामगार हा आपला आवाज मनामध्येच ठेवून युनियनला शरण गेलेला आहे.
ही सर्व परिस्थिती बदलविण्याकरता व कामगारांचा संपलेला आत्मविश्वास कामगार कायद्यावर व कायद्यावर उडालेला विश्वास परत प्रस्थापित करण्याकरता व कामगारांना न्याय मिळवून देण्याकरता युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्हारशाह महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती प्रिया झांबरे या स्वतः कामगारांचे शोषण थांबवावे, कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळावे तसेच नियमानुसार अस्थायी कामगारांना स्थायी करण्यात यावे व अस्थायी कामगाराला स्थायी करण्याकरता युनियनच्या माध्यमातुन होत असलेला भ्रष्टाचार थांबावा तसेच बल्हारशाह पेपर मिल मुळे पेपर मील मागील रहिवासी परिसरात पहाटे पहाटे तीन ते चार वाजता सोडण्यात येणाऱ्या गढूळ पाण्याने तेथील परिसरातील नागरिकांना होणारा त्रास हा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा याकरिता नगर परिषद बल्हारशाह जवळ पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे असे त्यांनी सांगितले.
पेपर मिल तथा बल्हारशाह नगरीतील नागरिकांनी या उपोषणाला सार्थक होत करण्याकरता व बल्हारशाह पेपर मिल मधील कामगारांच्या समस्यांना कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरता साथ द्यावी अशी विनंती युवा स्वाभिमान पक्षातर्फे करण्यात आली आहे.
पेपर मिल् कंपनी प्रशासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही , परंतु लवकरच सदर मुद्दा हा युवा स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून यावर बैठकीच्या माध्यमातन तात्काळ मागण्या मान्य करून घेण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुरज ठाकरे यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले आहे.
#priya zambare #pradipwalke #newsjagar #sudhirmungantiwar #devendrafadanvis #ravirana #yuvaswabhimanpaksh #surajthakare #ballarpurpaper #arunbarsagade