श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
सावली, दि.१६/०५/२०२३
सावली तालुक्यातील सोनापूर येथील शेतकरी तेजरावजी भुरसे यांचे शेतात पाणी करत असतानाच त्यांना विजेचा करंट लागल्याने ते होरपळत असतांना बाजूला असलेला मुलगा ही आपल्या वडीलाला वाचविण्यासाठी धावला आणि तोही गंभीर जखमी झाला आहे. newsjagar
यात शेतकरी तेजराव भुरसे यांचे निधन झाले तर त्यांच्या मुलगा दिनेश भुरसे हे देखील गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली.त्यांनतर पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.