कोटगुल क्षेत्रवासीयांच्या मागणीनुसार क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणार – धर्मरावबाबा आत्राम

श्री.नंदकिशोर वैरागडे , प्रतिनिधी, न्यूजने जागर 

कोरची:-

दिनांक १८सप्टेंबर २०२२ रोज – रविवारला शेतकरी, शेतमजूर, दुर्बल घटक बेरोजगार, व्यापारी यांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनासंदर्भात धर्मरावबाबा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा दरम्यान कोरची तालुक्यातील कोटगुल परिसरातील लोकांनी मा.राजे धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्री मंत्रालय मुंबई तथा विद्यामान आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्याकडे अनेक समस्या मांडले. प्रामुख्याने 33 के.व्ही.विद्युत सब सेंटर, कोटगुल या मुख्य गावाला तालुकाच्या दर्जा देणे. तालुका निर्मिती करणे, कोटगुल येथे ग्रामीण रुग्णालय देणे, मोबाईल टावर, सिंचनाची सोय करणे असे अनेक समस्या संबधी चर्चा झाली व ते समस्या सोडवण्यासंबधी मा.धर्मरावबाबा आत्राम साहेबांनी आश्वासन दिले.

यावेळी मा.भाग्यश्रीताई आत्राम माजी जि.प.अध्यक्षा गडचिरोली, रविभाऊ वासेकर, जिल्हाध्यक्ष राकाँपा, गडचिरोली, नानाभाऊ नाकाडे, माजी कृषी सभापती जि.प.गडचिरोली, शाहीनभाभी हकीम, महिला जिल्हाअध्यक्ष, लिलाधर भरडकर, रॉ. यु. काँ. जिल्हाअध्यक्ष, अनिल साधवानी, रॉ. यु. काँ. कार्याध्यक्ष, फहीमभाई काझी, जिल्हा उपाध्यक्ष,कोरची तालुका अध्यक्ष सियाराम हलामी, गिरीजा कोरेटी, अविनाश हुमणे, कपिल बागडे, स्वप्नील कराडे, चेतन कराडे, प्रेमसिंग उसेंडी, महेंद्र नुरुटी, अनिल कुंजाम, मंजुषा कुमरे,सरपंच कोटगुल, रामसाय कुमरे, केसरबाई दर्रो, रोमन नैताम, ब्रिजलाल कुमरे, पुरण कोरेटी, सोमनाथ कुमरे, लोमन उईके धम्मदीप लाडे, विशाल जांभुळे, अंजना मेश्राम, रमाबाई मेश्राम, कौशल्याबाई गावडे, गिरजा डोंगरे, सोहनतीन टेंभूर्ने, अंजना मडावी, कोमल कुमरे व राष्ट्रवादी परिवारातील बहुसंख्येने उपस्थित होते.