गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी:- तालुक्यातील लखमापुर बोरी केंद्रातंर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुरखळा माल येथे दि 02 आँक्टोंबर 2022 रोजी सत्य,अहिंसा व सहिष्णुतेची शिकवन देनारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान घोषनेचे प्रणेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच श्री.भास्कर बुरे उपस्थित होते. तर उदघाटक म्हणुन शा.व्य. समितीचे अध्यक्ष धनराज बुरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन शा.व्य. समितीच्या उपाध्यक्षा सौ. शारदा बोदलकर , शा.व्य. समितीचे सदस्य श्री.सोमनाथ मेश्राम, श्री.साईनाथ गेडेकर, सौ. शारदा रायकुंटवार, सौ. साधना सरपे, श्री. शंकर वेलादी, श्री. लोकेश सोमनकर, ग्रा.पं. सदस्य श्री.योगराज बुरे, अंगणवाडी सेविका सौ. सरिता बुरांडे, ग्रा.वि. अधिकारी श्री. मुळे साहेब, गावातील पालक श्री. लोशन रामटेके, श्री.योगेश बोदलकर, श्री.लालाजी गेडाम, श्री.नंदाजी रायसिडाम, श्री. अनिल आत्राम, शाळेचे मुख्याध्यापक गणेश बोईनवार सर, जेष्ठ शिक्षक श्री.रमेश गेडाम सर, विषय शिक्षक श्री. रघुनाथ भांडेकर सर, श्री. अशोक जुवारे सर, श्री. च.द्रकांत वेटे सर, श्री.कमलाकर कोंडावार सर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पन करुन करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बोईनवार सर यांनी केले. कार्यक्रमाचे उदघाटक श्री.धनराज बुरे यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर भास्कर बुरे यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांनी दिलेली शिकवन व स्वच्छतेविषयी अत्यंत महत्वाची माहीती मार्मिक शब्दांत सांगीतली.
“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ” समारोप प्रसंगी मुळे साहेब ग्रा. वि. अधिकारी यांनी आपल्या भाषणात ‘स्वच्छता हि सेवा’ या महापुरुषांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी विद्यार्थी, पालक, गावातील नागरीक ,पदाधिकारी व कर्मचारी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेऊन काम करावे ही भावना बोलुन दाखवली.या प्रसंगी ग्रामपंचायत मुरखळा माल च्या वतीने गावातील विशेष कार्य करणार्या व्यक्तींचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व नागरीकांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
त्यानंतर सर्व पदाधिकारी,शिक्षक, पालक , गावातील नागरीक व विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ केला व स्वच्छता हिच सेवा याची प्रचिती दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थी कु. गायत्री सरपे, कु. स्नेहा बुरे, कु.तृप्ती गाडेमोडे, कु. सलोनी गाडेमोडे, कु. वैभवी सातपुते, कु. ओमी मेश्राम, कु. प्रांजली मंडरे, कु. ओमीता गेडेकर, कु. चैतन्या गटलेवार, कु. केशर धानोरकर, कु. सिद्धी जुवारे, कु.श्राव्या मेश्राम, संकेत रामटेके, प्रज्वल जांपलवार, ओमदेव सोमनकर यांनी गांधीजी व लाल बहादुर शास्त्री यांच्या संबंधी भाषणे केली.
या कार्यक्रचे संचलन श्री. राजकुमार कुळसंगे सर यांनी केले तर आभार श्री. जगदीश कळाम सर यांनी मानले.